Sunday, September 4, 2011

असली क्या है नकली क्या है?

काही म्हणजे काही म्हणजे काही टोटलच लागत नाही हो आपल्या नेत्यांची निवडणुकीच्या काळात! (म्हणजे एरवी लागते , असंही नाहीये.) पण , एकदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की चमत्कारच घडायला लागतात.

म्हणजे असं बघा की निवडणुका जाहीर झाल्यावर जनता नावाचा काही प्रकार अस्तित्त्वात आहे , हे नेत्यांना पुसटसं आठवू लागतं. या जनतेतच ' मतदार ' नावाचा एक पोटप्रकार असतो आणि तो त्या कुठल्याशा त्या केंदांवर रांगा वगैरे लावून आपल्या नावावर शिक्कामोर्तब करतो , तेव्हा आपण निवडून येतो हेही त्यांना अंधुक अंधुक आठवायला लागतं , हा काय कमी मोठा चमत्कार आहे का ?

पण , या निवडणुकीत याहूनही मोठे चमत्कार घडताहेत.

म्हणजे उदाहरणार्थ समजा कुणी चटकन् तुम्हाला विचारलं की भारतीय जनता पक्षात मवाळ कोण आहे , जहाल कोण आहे ? विकासपुरुष कोण आणि लोहपुरुष कोण ? तर उत्तर सोपं आहे की नाही ? भारतीय जनता ' पाटीर् ' शांततेचे दूत , नोबेल पुरस्काराचे (मुशर्रफांबरोबर विभागून) संभाव्य मानकरी , कोमल कविहृदयाचे मवाळ विकासपुरुष या सगळ्या भूमिका आहेत अटलबिहारी वाजपेयींच्या. आणि कट्टर हिंदुत्ववादी , संभाव्य राममंदिराचे शिल्पकार , रुक्ष बाह्यरूपाचे वज्राहून कठोर लोहपुरुष हा हातखंडा रोल लालकृष्ण अडवाणींचा.

राइट! एकदम बरोबर!

मग आता सांगा पुढच्या विधानांपैकी कोणतं कुणाच्या तोंडी शोभतं ?

1. '
गोध्राकांडानंतरच्या दंगली हा रालोआ सरकारवरचा सर्वात मोठा कलंक आहे. '

2. '
कोणाही विदेशी लेखक-अभ्यासकाला आमच्या राष्ट्रपुरुषांशी खेळ करण्याचा अधिकार नाही. ' ( तो करायला आम्ही समर्थ आहोत ना! आणि हेही ' विदेशी ' करायला लागले , तर आम्ही पाच पाच वर्षं काढायची कशी ? करायचं काय ?)

पहिलं विधान नरेंद मोदींना राजधर्माची शिकवण देणाऱ्या वाजपेयींच्या तोंडी शोभतं आणि शंभर टक्के आपल्या आवाक्याबाहेरच असलेल्या कुणालाही दरडावण्याची भाषा... ( ' वांदे पूर्व ' मध्ये घुटमळू नका , इथे आपल्या राज्याचा नाही हो , देशाचा विचार चाललाय , त्यामुळे) अडवाणींच्या तोंडी शोभते.

पण , प्रत्यक्षात वाजपेयींना शोभणारं विधान अडवाणींनी आणि अडवाणींना शोभणारं विधान वाजपेयींनी करून फार म्हणजे फारच गोंधळ उडवून दिलाय. हिंदी सिनेमात जुळ्या भावांच्या गोष्टीत एक भाऊ बदमाष असतो , दुसरा सज्जन. ते जेव्हा क्लायमॅक्सला आमनेसामने येतात , तेव्हा दोघेही एकमेकांची नक्कल करून कोणता कोण आहे , याचा थांगपत्ता लागू देत नाहीत आणि व्हिलन मंडळींच्या तोंडाला फेस येतो , शिवाय त्यांनी खांबाला बांधून ठेवलेल्या जुळ्यांच्या ' माँ ' चंही भयंकर कन्फ्यूजन होतं... तसं काहीतरी या पाटीर्च्या ' मुखवटे आणि चेहरे ' कार्यक्रमात घडतंय बुवा!

...
आणि हे कमी होतं म्हणून की काय अडवाणींनी परवा आणखी एक बाँब टाकला... राजकारणात मूल्य , विवेक , साधनशुचिता वगैरेंतून काही साधत नाही. तेव्हा आमचा पक्ष यापुढे मूल्यांचं , साधनशुचितेचं राजकारण करण्याचा फंदात पडणार नाही...

...
हे फारच गंभीर आहे हो! कोणाची हिंमत झाली असेल अशी ?...

...
अडवाणी अजूनही देशाचे गृहमंत्री आहेत. या देशातल्या गुप्तचर यंत्रणा आजही त्यांच्या अखत्यारीत आहेत... या सर्व यंत्रणांना अडवाणींनी कामाला लावलं पाहिजे...

...
आणि आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं मूल्यांचं , साधनशुचितेचं राजकारण केलं आहे , अशी वावडी कुणी उडवली , याचा कसून तपास केला पाहिजे!

No comments:

Post a Comment